*दिनविशेष-जून,२०२२*
संकलन-श्री. नंदकुमार रेडेकर, शिक्षक जिल्हा परिषद शाळा आरल पुन.ता.पाटन ९४०४९६८२१६
*१ जून*
१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
मृत्यू:
१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
१९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
१९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.
*२ जून*
२०१४-तेलंगन भारताचे एकोणतीसावे राज्य झाले.
जन्म:
१९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .
मृत्यू:
१७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.
*३ जून*
१८१८-मराठेशाहीचा अस्त
१९१६-महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले.
जन्म:
१८९० - बाबूराव पेंटर, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.
१८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.
मृत्यू:
२००० - डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
*४ जून*
राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
१६७४-राज्याभिषेकापूर्वी छ. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली
मृत्यू:
१९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
१९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ.
१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
*५ जून*
जागतिक पर्यावरण दिन
जन्म:
१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
मृत्यू:
१९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ.
*६ जून*
१६७४-छ. शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक
जन्म:
१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
१९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
मृत्यू:
२००२ - शांता शेळके, मराठी कवयित्री
*७ जून*
मृत्यू:
१९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
१९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
२००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.
*८ जून*
१६७०-पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला परत शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला.
जागतिक महासागर दिन
जन्म:
१९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.
१९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार
*९ जून*
१६६५-पुरंदरचा तह झाला.
मृत्यू:
१९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक
*१० जून*
जन्म:
१९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.
१९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.
*११ जून*
मृत्यू:
१९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.
१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक
*१२ जून*
मृत्यू:
१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.
१९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
२००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
*१३ जून*
जन्म:
१८७९ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
मृत्यू:
१९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.
*१४ जून*
जन्म:
१३९८ - संत कबीर.
मृत्यू:
१९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक
*१५ जून*
जन्म:
१८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक.
१९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.
मृत्यू:
१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
*१६ जून*
१८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई
मृत्यू:
१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.
*१७ जून*
मृत्यू:
१६७४-राजमाता जिजाबाई.
१८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.
१८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.
*१८ जून*
मृत्यू:
१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.
१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार.
*१९ जून*
जन्म:
१९४७ - सलमान रश्दी, ब्रिटिश लेखक.
१९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.
*२० जून*
जन्म:
१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक
*२१ जून*
आंतरराष्ट्रीय योग दिवस; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.
जन्म:
१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
*२२ जून*
१८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
जन्म:
१८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.
*२३ जून*
१९८५ - एअर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.
मृत्यू:
१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ.
*२४ जून*
१९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला
*२५ जून*
मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस.
१९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.
१९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.
*२६ जून*
जन्म:
१८७४ - शाहू महाराज
१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.
मृत्यू:
१९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
२००१ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
*२७ जून*
जन्म:
१८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
मृत्यू:
१८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
२००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.
*२८ जून*
१९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची सारायेव्होमध्ये हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरूवात.
१९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.
जन्म:
१९२१ - पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.
*२९ जून*
जन्म:
१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
१९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.
*३० जून*
१९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.
मृत्यू:
१९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.
१९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
१९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.
No comments:
Post a Comment